Ksagar

स्पर्धा परीक्षा: विद्यार्थी आणि एक तटस्थ

self- analysis
(मला अपयश का येते?)
कौन्सिलिंग ला दोन्ही प्रकारचे विद्यार्थी येत असतात १. 4-5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि त्यात अपयश आलेले आणि २.प्रथमच स्पर्धा परीक्षा देणार आहेत परंतु याही विद्यार्थ्यांना आपणासही इतर सीनियर विद्यार्थ्यांप्रमाणे चार-पाच वेळा अपयशाची फळे चाखल्यावरच यशाची चव चाखता येईल का? अशी शंका असते, या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर मला काही कॉमन अशी स्पर्धा परीक्षेत सातत्याने अपयश का येते याची काही कारणे दिसली जी मी आपल्या पुढ्यात मांडत आहे.
1.आपण कष्ट करण्यात कमी पडतोय का?
2.आपली अभ्यास पद्धत योग्य आहे का?
3. आपण योग्य संदर्भांचा अभ्यास करत आहोत का?
4.अधिकारी होणे हे माझे स्वतःचे ध्येय आहे का?
5.मला अधिकारी व्हायचे आहे या ध्येयाला बांधील राहून आपला खरंच अभ्यास होत आहे का? (Without time killing योग्य असा.. म्हणजे अभ्यासिकेत सकाळी 7 ते रात्री 10पर्यंत बसतोय परंतु खरा अभ्यास फक्त 4 ते 5 तास होतोय.)
6.मी फक्त फॉर्म आला की फॉर्म भरतोय मग 2-3 महिने परीक्षेला जो वेळ आहे त्यामध्ये एखाद-दुसरा प्रश्नसंच/ पुस्तक वाचून अभ्यास करतोय. (आपल्या ध्येया बाबत जास्त सिरीयस नाही.. असे काही)
7.आपल्या आपल्या बाबतीत काही विशेष कल्पना आहेत का?
8.आपण दुसऱ्यांना पाहून या क्षेत्रात आलेलो आहोत का ?आपले ध्येय नसताना..
9. मलाही समाजात चार लोकांनी ओळखायला हवं जसे इतर अधिकाऱ्यांना आजूबाजूच्या गावांमध्ये जसे ओळखतात असे मलाही ओळखावे मलाही प्रसिद्धी मिळावी.. (प्रसिद्ध व्हावे याचे एक माध्यम म्हणून मला अधिकारी व्हायचे आहे का?)
10. मार्केटिंग चा बळी पडलो?अशी काही कारणे आहेत ज्यामुळे अधिकारी होणे या ध्येयाला अपयशाचा सामना करावा लागतोय धन्यवाद
डॉ.अनिरुद्ध  के’सागर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *