होय !! मराठीत संदर्भ उपलब्ध राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ साठी गेली ४० वर्ष सतत विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करून त्यांना अधिकारी बनवण्यासाठी , विद्यार्थ्यांच्या कष्टाचा खरा सोबती म्हणजे के’सागर, राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ साठी मराठीत संदर्भ उपलब्ध केलेले आहे.विद्यार्थी मित्रांनी २०२५ चे लक्ष ठेऊन अभ्यासाची तयारी सुरु केलेली आणि ध्येय पूर्ती साठी अविरत कष्ट करण्याची मानसिकता तयार केल्या वर तुम्हाला तुमच्या ध्येया पर्यंत नेण्यासाठी के’सागर सुद्धा सज्ज आहे. तुमच्या कष्टाचा खरा सोबती म्हणजेच के’सागर राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ साठी दिलेल्या व्हिडिओ मधील सर्व पुस्तके के’सागर प्रकाशन आणि अनिरुद्ध पब्लिकेशन हाऊस तर्फे उपलब्ध आहे. चला तर २०२५ चे अधिकारी होण्याचे स्वप्न के’सागर ला सोबत घेऊन पूर्ण करूया.

test

करोना परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षा लांबणीवर गेल्यात अन् यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे अधिकारी बनण्याची महत्वकांक्षा, लागणारा वेळ, येणारे नैराश्य  हा विषय समोर आला आहे.
अनेक जण म्हणत आहेत, स्पर्धापरीक्षा म्हणजे सर्व काही नाही, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी इतर क्षेत्रातही उत्तम काम करू शकतो, स्पर्धा परीक्षेत तीन ते पाच वर्ष यापेक्षा जास्त काळ देऊ नये आणि अनेक काही… खरंच यावर आपण बोलायला हवं.. कारण एक विद्यार्थी वकिलीचा अभ्यास करणारा पुढे जाऊन चांगला वकील बनू शकतो किंवा बिझनेस मॅनेजमेंट शिकून कोणता विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावर काम करू शकतो किंवा बीएससी ऍग्री करून कोणी शेतीमध्ये आधुनिकता आणू शकतो किंवा कोणी मेडिकल चा विद्यार्थी चांगला डॉक्टर बनून कोणाचा जीव वाचवू शकतो, असे सर्वजण(समाज सेवा का आभासी प्रसिद्धी) यासाठी स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात गोल गोल स्पर्धा करत कितीतरी वर्ष अभ्यास करत आहेत नक्कीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आयुष्यात खूप काही शिकवून जातो, आयुष्याला एक वेगळा आयाम देतो, आकार देतो परंतु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे कधीच शिकवत नाही.. स्पर्धा परीक्षा म्हणजेच सर्व काही नाही, सर्वस्व नाही.
मुळातच प्रत्येक माणूस, प्रत्येक विद्यार्थी आपल्या यशासाठी झटत असतो, प्रयत्न करत असतो. प्रत्येक विद्यार्थी हाच विचार करत असतो की, बाकीच्यांना जमले नाही याचा अर्थ असा नाही की मला ही जमणार नाही, मी जास्त अभ्यास करेल २- एक पुस्तके वाचेल, स्टेट बोर्ड चे पारायण करेल जे फक्त 10वी syllabus कव्हर करतात आणि पदवीस्तर स्पर्धा परीक्षा यशस्वी होईल, बाकीच्यांनी केलेल्या चुका मी करणार नाही आणि यशस्वी होईल आणि या विचारात जेव्हा आपण 3,5,7 वर्ष अभ्यास करतो आणि अपयशाचे धक्के खातो तेव्हा एक मानसिकता तयार होते “खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी” आता मी माझ्या आयुष्याची उमेदीची 5-7 वर्ष स्पर्धा परीक्षेत वाया घालवलेली आहेत माझ्या गावाच्या पंचक्रोशीत सर्वांनाच माहित आहे की हा मुलगा भावी तहसीलदार आहे ,भावी PSI आहे आणि हेच ती गावच्या पारावर बसणारी लोक ज्याचें आपण अनाहूतपणे टेन्शन घेतो आणि स्वतः स्वतःची एक व्याख्या बनवतो आता इथून मागे फिरलो तर मी अपयशी ही सर्व लोक मला अपयशी समजतील आयुष्यात वयाच्या तिसाव्या वर्षीच मी काहीच करु शकलो नाही असं समजतील आणि आयुष्यभरासाठी अपयशाचा शिक्का लावतील म्हणून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात फिरत राहतो. या मधील काही मुद्दे मी अधोरेखित करतो 1. समाज काय म्हणेल त्यांच्या दृष्टीने मी अपयशी ठरेल. आपण दुसरे काय म्हणतील, याचा विचार करणे प्रथम सोडायला हवा, आपण स्वतः इतरांना सांगायला हवे स्पर्धापरीक्षा म्हणजे सर्व काही नाही आणि स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजे सर्व नाही आणि अपयश म्हणजे ही सर्व नाही गावातील लोकांचा(समाजाचा) दृष्टिकोन एका दिवसात बदलणार नाही पण आपण तो प्रयत्न करायला हवा 2. पालकांनी सुद्धा हे समजायला हवे स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजे सर्व काही नाही जगात अनेक इतर क्षेत्र आहेत, स्पर्धा परीक्षा सोडून जेथून यश, पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान सर्व काही मिळू शकते. आपणही पाल्यांना अधिकारीच हो हे न म्हणता त्याचा कल कुठे आहे हे समजून त्यास दुसऱ्या क्षेत्राकडे किंवा दुसऱ्या क्षेत्रातील opportunity सांगायला हव्यात. 3.मी (विद्यार्थी) पाच वर्षानंतर स्पर्धा परीक्षेतून दुसऱ्या क्षेत्राकडे वळालो तर मी अपयशी नाही हे समजून घ्यावे,  दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय विद्यार्थी कधीही घेऊ शकतो, आयुष्यात कोणताही निर्णय हा योग्य नसतो त्यास कष्ट करून योग्य, बरोबर बनवावा लागतो, हे नेहमी लक्षात ठेवा निर्णय वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असतात आणि बदलावे लागतात त्यामुळे स्पर्धा परीक्षेतून दुसऱ्या क्षेत्रात जाणे निर्णय कधीच चुकीचा किंवा बरोबर नसतो तो आपल्याला आपल्या कष्टांवर बरोबर की चूक आहे ठरतो.
मी नेहमी सांगतो Plan-B म्हणजे अपयश नव्हे आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जेव्हा  एक रस्ता बंद असताना दुसऱ्या रस्त्याने पुढे जाणे, यशस्वी होणे म्हणजे प्लॅन बी
स्पर्धा परिक्षेमधून दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय याकडे सर्व विद्यार्थ्यांनी, मार्गदर्शकांनी, पालकांनी आणि समाजातील सर्व लोकांनी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहायला हवे. तो अपयशी झाला म्हणून दुसरीकडे जातोय असा विचार करायला नको किंबहुना दुसऱ्या क्षेत्रात त्याच्यासाठी याहून मोठी यशाची संधी असेल आणि तो दुसऱ्या क्षेत्रातूनही समाजाचे हित करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो हा दृष्टीकोन आपण सर्वांनी ठेवायला हवा.
डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर

self- analysis
(मला अपयश का येते?)
कौन्सिलिंग ला दोन्ही प्रकारचे विद्यार्थी येत असतात १. 4-5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि त्यात अपयश आलेले आणि २.प्रथमच स्पर्धा परीक्षा देणार आहेत परंतु याही विद्यार्थ्यांना आपणासही इतर सीनियर विद्यार्थ्यांप्रमाणे चार-पाच वेळा अपयशाची फळे चाखल्यावरच यशाची चव चाखता येईल का? अशी शंका असते, या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर मला काही कॉमन अशी स्पर्धा परीक्षेत सातत्याने अपयश का येते याची काही कारणे दिसली जी मी आपल्या पुढ्यात मांडत आहे.
1.आपण कष्ट करण्यात कमी पडतोय का?
2.आपली अभ्यास पद्धत योग्य आहे का?
3. आपण योग्य संदर्भांचा अभ्यास करत आहोत का?
4.अधिकारी होणे हे माझे स्वतःचे ध्येय आहे का?
5.मला अधिकारी व्हायचे आहे या ध्येयाला बांधील राहून आपला खरंच अभ्यास होत आहे का? (Without time killing योग्य असा.. म्हणजे अभ्यासिकेत सकाळी 7 ते रात्री 10पर्यंत बसतोय परंतु खरा अभ्यास फक्त 4 ते 5 तास होतोय.)
6.मी फक्त फॉर्म आला की फॉर्म भरतोय मग 2-3 महिने परीक्षेला जो वेळ आहे त्यामध्ये एखाद-दुसरा प्रश्नसंच/ पुस्तक वाचून अभ्यास करतोय. (आपल्या ध्येया बाबत जास्त सिरीयस नाही.. असे काही)
7.आपल्या आपल्या बाबतीत काही विशेष कल्पना आहेत का?
8.आपण दुसऱ्यांना पाहून या क्षेत्रात आलेलो आहोत का ?आपले ध्येय नसताना..
9. मलाही समाजात चार लोकांनी ओळखायला हवं जसे इतर अधिकाऱ्यांना आजूबाजूच्या गावांमध्ये जसे ओळखतात असे मलाही ओळखावे मलाही प्रसिद्धी मिळावी.. (प्रसिद्ध व्हावे याचे एक माध्यम म्हणून मला अधिकारी व्हायचे आहे का?)
10. मार्केटिंग चा बळी पडलो?अशी काही कारणे आहेत ज्यामुळे अधिकारी होणे या ध्येयाला अपयशाचा सामना करावा लागतोय धन्यवाद
डॉ.अनिरुद्ध  के’सागर